Featured Posts
Recent Articles

मुंबईत राडा, बेस्ट बसेसना फटका

वाढती महागाई आटोक्यात ठेवण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी रालोआसह सर्व विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला आहे. या बंदला मुंबईसह महाराष्ट्रात हिंसक वळण लागले आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर येथे ठिकठिकाणी दगडफेक, बसची तोडफोड अशा स्वरुपाच्या घटना घडल्या आहेत.

राज्यात रात्री बारा वाजल्यापासूनच भाजप, शिवसेना आणि रिपाइंचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सर्व प्रमुख शहरांमध्ये बस वाहतूक बंद पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न होत आहेत. मुंबईत ४३, पुण्यात १५, नागपूरमध्ये दहा तर ठाण्यात एका बसची तोडफोड झाल्याचे वृत्त आतापर्यंत हाती आले आहे. बंद यशस्वी करण्यासाठी बसेसवर सुरू असलेल्या हल्ल्यांमध्ये मुंबई आणि नागपूर येथे बस ड्रायव्हर जखमी झाले.

पुण्यात डेक्कन, कोथरुड आणि महापालिका परिसरात दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. दिवस उजाडेपर्यंत पुण्यात तब्बल १५ बसची तोडफोड करण्यात आली. नागपूरमध्ये दहा बसची तोडफोड करण्यात आली. काही ठिकाणी तुरळक दगडफेकीच्या घटना घडल्या. नागपूरच्या गणेशपेठ परिसरात भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हिंसक कारवाईत एका बसचालकाचा हात फ्रॅक्चर झाला आहे.

ठाण्यात स्टेशन परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी टीएमटीची एक बस फोडली तसेच तुरळक दगडफेक केली. कार्यकर्त्यांकडून नागरिकांना सातत्याने बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

रेल्वे आणि रस्ते वाहतूक रोखण्याचे प्रयत्न

महागाईचा निषेध करण्यासाठी विरोधकांनी मुंबई आणि ठाण्यात रेल्वे वाहतूक बंद पाडण्याचे प्रयत्न केले. मात्र पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे सकाळी दहा वाजेपर्यंत तरी हे प्रयत्न यशस्वी झाले नव्हते. शिवसेना, भाजप आणि रिपाइंडच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या प्रभाव क्षेत्रात रस्ते अडवणे, दगडफेक करुन वाहतूक बंद पाडणे अशा प्रकारच्या तुरळक हिंसक कारवाया केल्या. बहुतांश नागरिकांनी नुकसान टाळळण्यासाठी खासगी वाहने रस्त्यावर आणणे टाळले. त्यामुळे पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गांवर नेहमीच्या तुलनेत अतिशय कमी वर्दळ दिसून आली.

भाजप नेत्यांची धरपकड

बंदच्या निमित्ताने होत असलेल्या तोडफोडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भाजप नेत्यांची धरपकड सुरू केली आहे. सुधीर मुनगंटीवार, सरदार तारासिंह, किरीट सोमय्या या भाजप नेत्यांना मुलुंड परिसरातून अटक करण्यात आली आहे.

उर्वरित महाराष्ट्रातही ' बंद '!

नवी मुंबई, कोकण, सांगली, चंद्रपूर, गोंदीया, बीड येथेही बंदचा प्रभाव दिसून आला. बंदमुळे रस्ते ओस पडले. दूध, फळे, भाज्या आदी अत्यावश्यक अन्नपदार्थांच्या वाहतुकीवरही परिणाम झाला. दूध आणि भाज्यांची टंचाई निर्माण झाल्यामुळे सामान्यांचे हाल झाले.

Share and Enjoy:

0 comments for this post

Leave a reply

We will keep You Updated...
Sign up to receive breaking news
as well as receive other site updates!
Subscribe via RSS Feed subscribe to feeds
Sponsors
Template By SpicyTrickS.comSpicytricks.comspicytricks.com
Template By SpicyTrickS.comspicytricks.comSpicytricks.com
Popular Posts
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud