Home » sindhu news »
आंबोली घाटात नवे संकट
- सकाळ वृत्तसेवा
आंबोली - घाटातील पूर्वीचा वसाजवळील कड्याकडील भागात दरडीची भेग रुंदावली आहे. यामुळे वाहतुकीस नवा धोका निर्माण झाला आहे.
घाटातील पूर्वीचा वस येथून 100 मीटर अंतरावरील कड्यावरच्या भागाची भेग रुंदावली आहे.
कोसळण्याच्या स्थितीतील भाग सहज काढता येणे शक्य आहे. बांधकाम विभागाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. घाटातील पूर्वीचा वसाजवळ साधारण 30-40 फूट उंच कड्याच्या बाजूने कपारीला ही भेग पडली आहे. सध्या दीड ते दोन फूट भेग वाढली आहे. हा भाग वन विभागाच्या ताब्यात आहे. ग्रामस्थांनी सहा महिन्यांपूर्वी वन विभागास याची कल्पनाही दिली होती. बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनीही आठ दिवसांपूर्वी पाहणी केली; मात्र त्यावर उपाय न योजल्याने भीतीचे सावट कायम आहे.
हा धोकादायक भाग काढणे कठीण नाही. केवळ एक-दीड तास हे काम आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. वन विभाग तर केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आपल्या हद्दीत येत नाही असे सांगते; मग याकडे लक्ष देणार कोण, हा प्रश्न आहे. गेल्या वर्षीपासून आता पाऊस सुरू होईपर्यंत जमले नाही ते आता काय जमणार, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. या ठिकाणी अपघात घडल्यास दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तथा माजी सरपंच जगन्नाथ गावडे यांनी दिला आहे. दोन्ही विभागांनी या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी वर्षभर काय केले, त्याचेही उत्तर द्यावे. धोका समोर दिसत असताना कोणतीही खबरदारी न घेणे हा बेजबाबदारपणा आहे. अपघात घडल्यास तेच जबाबदार राहतील, असे श्री. गावडे यांनी म्हटले आहे.
घाटातील पूर्वीचा वस येथून 100 मीटर अंतरावरील कड्यावरच्या भागाची भेग रुंदावली आहे.
कोसळण्याच्या स्थितीतील भाग सहज काढता येणे शक्य आहे. बांधकाम विभागाने मात्र त्याकडे दुर्लक्ष केले आहे. घाटातील पूर्वीचा वसाजवळ साधारण 30-40 फूट उंच कड्याच्या बाजूने कपारीला ही भेग पडली आहे. सध्या दीड ते दोन फूट भेग वाढली आहे. हा भाग वन विभागाच्या ताब्यात आहे. ग्रामस्थांनी सहा महिन्यांपूर्वी वन विभागास याची कल्पनाही दिली होती. बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनीही आठ दिवसांपूर्वी पाहणी केली; मात्र त्यावर उपाय न योजल्याने भीतीचे सावट कायम आहे.
हा धोकादायक भाग काढणे कठीण नाही. केवळ एक-दीड तास हे काम आहे; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. वन विभाग तर केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आपल्या हद्दीत येत नाही असे सांगते; मग याकडे लक्ष देणार कोण, हा प्रश्न आहे. गेल्या वर्षीपासून आता पाऊस सुरू होईपर्यंत जमले नाही ते आता काय जमणार, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. या ठिकाणी अपघात घडल्यास दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तथा माजी सरपंच जगन्नाथ गावडे यांनी दिला आहे. दोन्ही विभागांनी या ठिकाणी उपाययोजना करण्यासाठी वर्षभर काय केले, त्याचेही उत्तर द्यावे. धोका समोर दिसत असताना कोणतीही खबरदारी न घेणे हा बेजबाबदारपणा आहे. अपघात घडल्यास तेच जबाबदार राहतील, असे श्री. गावडे यांनी म्हटले आहे.
Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
Popular Posts
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud
0 comments for this post
Leave a reply