Home » महाराष्ट्र माझा »
जीवनविद्या मिशनचे सदगुरू वामनराव पै यांचे निधन
जीवनविद्या मिशनचे संस्थापक सदगुरू वामनराव पै यांचे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास मुंबईत निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. आपल्या रसाळ वाणीतील प्रवचनांनी त्यांनी अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणला होता. त्यांच्या जाण्याने त्यांच्या लक्षावधी भक्तांवर शोककळा पसरली आहे.
१४ ते १६ एप्रिल असे जीवनविद्या मिशनच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते घरीच होते. दरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना १८ एप्रिल रोजी कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तब्बल ४२ दिवसांच्या उपचारानंतर मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे , आरोग्य दे ,
सर्वांना सुखात , आनंदात , ऐश्वर्यात ठेव ,
सर्वांच भल कर , कल्याण कर , रक्षण कर ,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
या श्लोकातून ' सर्वेत्र सुखिन सन्तु ' चे मंत्रसार लोकांच्या भाषेतून लोकांपर्यंत पोहचवत त्यांनी जीवनविद्या मिशनची मांडणी केली. आजवर दिलेल्या हजारो प्रवचनांमधून, अनेक पुस्तकांमधून त्यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले रोजचे काम करताना, परमेश्वराकडे जाणारा सन्मार्ग कसा जपायचा त्याचा उपदेश केला.
वामनराव पै यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९२३ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. १९४४ मध्ये पदवीधर झालेल्या त्यांनी काही काळ सरकारी नोकरीही केली. पण नोकरीपेक्षा जीवनचिंतनात आणि कर्मयोगाच्या अभ्यासात त्यांचे मन अधिक रमत असे. दरम्यान ते काळाचौकी, दादर भागात प्रवचने करत असत.
कामगार विभागात त्यांची ही प्रवचने लोकांना आधार वाटू लागली. चिंचपोकळीतील कामगार केंद्रात, काळाचौकी येथील हनुमान मंदिरात त्यांचा नियमितपणे प्रवचने होत असत. त्याचवेळी त्यांना आपल्या श्रोत्यांच्या साथीने नाम संप्रदाय मंडळाचा संकल्प सोडला. त्याचेच पुढे १९५५ मध्ये जीवन विद्या मिशन झाले आणि ते अनेकांच्या आय़ुष्याचे ध्येय ठरले.
अज्ञान आणि अंधश्रध्देच्या शापातून दूर करत पै यांनी लोकांना कर्मयोगाचा, सर्वाबद्दल प्रेम जपण्याचा आणि विश्वशांतीचा भाग बनण्याचा संदेश दिला. १९८० मध्ये मिशनची अधिकृत नोंदणी झाली आणि ते चालवण्यासाठी अधिकृतरित्या कार्यकारणी मंडळाची निवड करण्यात आली.
१९८० मध्ये मिशनचा रौप्य महोत्सव साजरा झाला त्यानिमत्त समाज प्रबोधन महोत्सव आयोजित केला गेला होता. तसेच २००६ साली जीवनविद्येच्या चळवळीला ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून ६ ते ८ जानेवारी दरम्यान वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भव्य सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला होता.
१४ ते १६ एप्रिल असे जीवनविद्या मिशनच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर ते घरीच होते. दरम्यान त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना १८ एप्रिल रोजी कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तब्बल ४२ दिवसांच्या उपचारानंतर मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे , आरोग्य दे ,
सर्वांना सुखात , आनंदात , ऐश्वर्यात ठेव ,
सर्वांच भल कर , कल्याण कर , रक्षण कर ,
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे
या श्लोकातून ' सर्वेत्र सुखिन सन्तु ' चे मंत्रसार लोकांच्या भाषेतून लोकांपर्यंत पोहचवत त्यांनी जीवनविद्या मिशनची मांडणी केली. आजवर दिलेल्या हजारो प्रवचनांमधून, अनेक पुस्तकांमधून त्यांनी आजच्या धकाधकीच्या जीवनात आपले रोजचे काम करताना, परमेश्वराकडे जाणारा सन्मार्ग कसा जपायचा त्याचा उपदेश केला.
वामनराव पै यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९२३ रोजी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. १९४४ मध्ये पदवीधर झालेल्या त्यांनी काही काळ सरकारी नोकरीही केली. पण नोकरीपेक्षा जीवनचिंतनात आणि कर्मयोगाच्या अभ्यासात त्यांचे मन अधिक रमत असे. दरम्यान ते काळाचौकी, दादर भागात प्रवचने करत असत.
कामगार विभागात त्यांची ही प्रवचने लोकांना आधार वाटू लागली. चिंचपोकळीतील कामगार केंद्रात, काळाचौकी येथील हनुमान मंदिरात त्यांचा नियमितपणे प्रवचने होत असत. त्याचवेळी त्यांना आपल्या श्रोत्यांच्या साथीने नाम संप्रदाय मंडळाचा संकल्प सोडला. त्याचेच पुढे १९५५ मध्ये जीवन विद्या मिशन झाले आणि ते अनेकांच्या आय़ुष्याचे ध्येय ठरले.
अज्ञान आणि अंधश्रध्देच्या शापातून दूर करत पै यांनी लोकांना कर्मयोगाचा, सर्वाबद्दल प्रेम जपण्याचा आणि विश्वशांतीचा भाग बनण्याचा संदेश दिला. १९८० मध्ये मिशनची अधिकृत नोंदणी झाली आणि ते चालवण्यासाठी अधिकृतरित्या कार्यकारणी मंडळाची निवड करण्यात आली.
१९८० मध्ये मिशनचा रौप्य महोत्सव साजरा झाला त्यानिमत्त समाज प्रबोधन महोत्सव आयोजित केला गेला होता. तसेच २००६ साली जीवनविद्येच्या चळवळीला ५० वर्षे पूर्ण झाली म्हणून ६ ते ८ जानेवारी दरम्यान वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे भव्य सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा करण्यात आला होता.
Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
Popular Posts
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud
0 comments for this post
Leave a reply