Home » Sport News »
सचिनने उलगडले 'लोगो'विना बॅटचे रहस्य
मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
आज ' सचिन तेंडुलकर ' हा अब्जावधी रुपयांचा ब्रॅण्ड झाला असला तरी, १९९६ च्या वर्ल्डकपमध्ये सचिनच्या बॅटवर कोणताही लोगो नव्हता. सचिन तेव्हाही लोकप्रिय होता, पण त्यावेळी त्याच्या बॅटवर कोणाताही लोगो का नव्हता ? याचे रहस्य त्याने जगापुढे जाहीर केले आहे.
' टाइम' नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत त्याने यामागची आपली भूमिका मांडली आहे.
सचिन म्हणतो, एका मोठ्या कंपनीने मला त्यांचा लोगो बॅटवर लावण्यासाठी भरभक्कम रक्कम देण्याची ऑफर दिली होती. मात्र तोपर्यंत, मी स्पर्धेतील दोन सामने खेळला होता. लोगोविना बॅट वापरण्याची सवय त्याला झाली होती. अशा वेळी लोगो लावल्यास, आपले चित्त विचलीत होऊ शकले असते. म्हणूनच मी माझ्या स्पॉन्सरला सांगितले की, तुम्ही कितीही रक्कम देऊ केली तरी मी लोगो लावणार नाही. माझ्यासाठी पैसे महत्त्वाचे नाहीत, तर बॅटमधून धावा निघणे हे देशासाठी आवश्यक आहे .
तेव्हा संघाचे व्यवस्थापक असलेले, माजी कर्णधार अजित वाडेकर ह्यांनी सांगितले की, सचिनचे हे कारण कळल्यावर मला त्याचा अभिमान वाटला.
सचिन नेहमी सांगतो की, माझ्यासाठी भारताला विजय मिळवून देणे हे इतर कोणत्याही बाबीपेक्षा महत्त्वाचे असते. ह्याची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आली.
त्या स्पर्धेत, सचिनने, ८७.४६च्या सरासरीने, ५२३ धावा केल्या. त्या स्पर्धेत भारताला, उपान्त्य फेरीत श्रीलंकेने हरवले होते. तेव्हा संघात असणा-या विनोद कांबळीने गेल्या वर्षी हा सामना फिक्स्ड होता असा आरोप केला होता.
आज ' सचिन तेंडुलकर ' हा अब्जावधी रुपयांचा ब्रॅण्ड झाला असला तरी, १९९६ च्या वर्ल्डकपमध्ये सचिनच्या बॅटवर कोणताही लोगो नव्हता. सचिन तेव्हाही लोकप्रिय होता, पण त्यावेळी त्याच्या बॅटवर कोणाताही लोगो का नव्हता ? याचे रहस्य त्याने जगापुढे जाहीर केले आहे.
' टाइम' नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत त्याने यामागची आपली भूमिका मांडली आहे.
सचिन म्हणतो, एका मोठ्या कंपनीने मला त्यांचा लोगो बॅटवर लावण्यासाठी भरभक्कम रक्कम देण्याची ऑफर दिली होती. मात्र तोपर्यंत, मी स्पर्धेतील दोन सामने खेळला होता. लोगोविना बॅट वापरण्याची सवय त्याला झाली होती. अशा वेळी लोगो लावल्यास, आपले चित्त विचलीत होऊ शकले असते. म्हणूनच मी माझ्या स्पॉन्सरला सांगितले की, तुम्ही कितीही रक्कम देऊ केली तरी मी लोगो लावणार नाही. माझ्यासाठी पैसे महत्त्वाचे नाहीत, तर बॅटमधून धावा निघणे हे देशासाठी आवश्यक आहे .
तेव्हा संघाचे व्यवस्थापक असलेले, माजी कर्णधार अजित वाडेकर ह्यांनी सांगितले की, सचिनचे हे कारण कळल्यावर मला त्याचा अभिमान वाटला.
सचिन नेहमी सांगतो की, माझ्यासाठी भारताला विजय मिळवून देणे हे इतर कोणत्याही बाबीपेक्षा महत्त्वाचे असते. ह्याची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा दिसून आली.
त्या स्पर्धेत, सचिनने, ८७.४६च्या सरासरीने, ५२३ धावा केल्या. त्या स्पर्धेत भारताला, उपान्त्य फेरीत श्रीलंकेने हरवले होते. तेव्हा संघात असणा-या विनोद कांबळीने गेल्या वर्षी हा सामना फिक्स्ड होता असा आरोप केला होता.

Related posts:
If you enjoyed this article, subscribe to receive more great content just like it.
Popular Posts
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
Recent Stories
Connect with Facebook
Sponsors
Search
Archives
Categories
Blog Archives
Recent Comments
Tag Cloud
0 comments for this post
Leave a reply